आमची स्थापना
१ मे, १९७४ रोजी कंपनी कायद्याअंतर्गत स्थापन झालेली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असून अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी स्थापन झाले आहे. महामंडळाचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण उदयोग, उर्जा व कामगार विभागाकडे होते.महामंडळाचे सुरुवातीचे नाव महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ असे होते. शासन निर्णय क्र. चविम १०९५/ (६४६१)/उद्योग-५, दि.२४.६.१९९६ अन्वये महामंडळाचे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. शासनाच्या दि.२.१.२००३ च्या शासन निर्णयानुसार महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., असे करण्यात आलेले आहे.